इंदापूर प्रतिनिधी
श्री गणरायाने कोरोनाचे संकट दूर करून, मानवी जनजीवन पूर्ववत करावे,असे साकडे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.31) घातले .
शहाजीनगर येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती गणेशोत्सवानिमित्त गणरायाची आरती राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी कोरोनाच्या संकटाविषयी चिंता व्यक्त करून राजवर्धन पाटील यांनी सर्वांनी काटेकोरपणे काळजी घ्यावी , असे आवाहन केले . याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील , अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .