Type Here to Get Search Results !

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची हानी

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची  हानी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

पद्मविभूषण बाबासाहेबांच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 15 :-  “ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची  मोठी  हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.  पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.”  अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test