एसटी कर्मचार्यांचा संप चर्चेतूनच सुटू शकतो : शरद पवार
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती वाईट आहे. एसटीचे अर्थकारण कसे सुधारावे, यावर विचार करण्याची गरज आहे, असे स्पष्ट करत एसटीचा संप चर्चेतूनच सुटू शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाबळेश्वर येथे व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त शरद पवार महाबळेश्वर येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यावर्षी राज्य सरकारला एसटीची पगार द्यावा लागला. एसटी महामंडळाला राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी स्थिती यापूर्वी कधीच नव्हती. एसटीचे अर्थकारण कसे सुधारावे, यावर विचार करण्याची गरज आहे. विलिनीकरणाचा मुदा हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळें यावर भाष्य करता येणार नाही, असेही ते म्हणाले.