नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप.
सोमेश्वरनगर - बऱ्याच दिवसांच्या प्रदीर्घ काळानंतर बुधवार दि 17 रोजी दुपारी 3 च्या दरम्यान तालुक्यात सोमेश्वरनगर परिसरात पावसाची रिपरिप सुरुवात झाल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला. तर शेवटच्या टप्प्यात सुकलेल्या मका, ज्वारी तरकारी व ऊस पिकासह झालेल्या पावसामुळे चांगलीच तेजी आली आहे .
शेतकऱ्याने नुकतीच खुरपण, औषद फवारणी शेतकऱ्यांच्या अंगलट आली आहे ऊस ,मका सह शेतातील तरकारी प्रामुख्याने पेरा असलेल्या शेतकऱ्यांनी थाेड्याफार पावसाने उगवलेल्या पिकाची आंतरमशागत करण्यासाठी एक-दाेन दुंडे झाल्यानंतर न खुरपण करत अळ्या व किड्यांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी महागडी औषद फवारणी केली. याचा मात्र परिणाम होणार नाही असे एका शेतकऱ्याने बोलताना सांगितले तर प्रदीर्घ काळानंतर अचानक पावसाने शेतकऱ्यांचा सगळा खर्च अनाठायी, व्यर्थ गेला असून तरकरी पीक वर होणार परिणाम पाहून शेतकरी पुरता हवालदिल झाला.
यंदा पावसाची सरासरी अधिक असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याने मृगानंतर झालेल्या थाेड्याफार पावसामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या हाेत्या. मधल्या काळात पाच-दहा मिनिटे तुरळक पाऊस वगळता पावसाने माेठी आेढ दिली हाेती. परिणामी दोन ते तीन महिन्यांची पीक असलेल्या मका, ज्वारी व काही तरकरी पिकाची वाढ खुंटली व शेवटच्या टप्प्यात पिके करपून जात असतानाच बुधवारी झालेल्या पावसाने पिकांना चांगलीच तेजी येणार आहे तर बांधलेल्या ऊसहि आता चांगलाच टवटवीत झाला असल्याने ऊस उत्पादनातही वाढ होताना दिसणार आहे याची समाधान परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी केले आहेया



